मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढायला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात येत्या २ दिवसात लॉकडाऊन जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता संपूर्ण विद्यार्थी आणि पालकवर्गाचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा सुद्धा बदलण्यात आल्या आहेत.
या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षताई गायकवाड यांनी ट्विटकरून माहिती दिलेली आहे. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तारखेकडे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात माहिती देताना शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
त्यामुळे आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा, अशी विनंती मी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
???? Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) pic.twitter.com/cjeRZAT7ux
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021