मुंबई :- राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज किंचितशी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या १८ हजार ०७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ७९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात गेल्या २४ तासात ३६ हजार २८१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
दुसरीकडे राज्यात आज ११३ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाले आहे. आतापर्यंत ३३३४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १७०१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती:-
मुंबईत आज कोरोना रुग्णसंख्येत थोडीशी वाढ झाली आहे. १ हजार १२८ नवे कोरोनाबाधित आढळले असून १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांत १ हजार ८३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका आहे.