मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचा र्निणय शिक्षण विभागाने घेतला आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
शिक्षण विभागाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा या ऑफलाइन पद्धती होणार असून आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.