फेब्रुवारी महिन्यापासून देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरुवात झालीय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. तसेच आव्हाडांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
अनेक महाविद्यालये आणि एनजीओ लॉकडाऊनच्या काळात बंद असल्यामुळे रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे.आपण ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असे म्हणत असतो. या वाक्याला प्रेरित होऊन आपण रक्तदानही करत असतो. पण राज्यात गेल्या काही महिन्यापासून रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता राज्यावर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरे न झाल्याने पुढील ७ ते ८ दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे.
राज्यातील रक्तसाठा संपत आला असून सर्व स्वयंसेवी संस्था, रक्तपेढ्या आणि राजकीय नेत्यांनी रक्तदान शिबिरांचं आयोजन करून रक्तसाठा वाढवावा, अशा सूचना राज्याचे अन्नआणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलंय.