मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार पडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आहे. त्यांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख मुकर्रर केली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. आमचं राजकारणातील युद्ध आम्ही लढूच. त्यामुळे त्यांना गुढी पाडव्याच्या आमच्या शुभेच्छा आहेच. सरकार पाडण्यासाठी त्यांनी एखादी तारीख मुकर्रर केली असेल त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला लगावला होता.
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखविले होते.