यवतमाळ दि.१२- संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दावा केला आहे. तसे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. हरीभाऊ राठोड हे भटके विमुक्त आणि बहुजन समाजाचे नेते आहेत.
राज्यात शिवसेनेची सत्ता यावी यासाठी त्यांनी ओबीसी नेत्यांची मोट बांधून शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचार केला होता. त्यामुळे आमदारकीची टर्म संपल्यावर काँग्रेसकडून दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. शिवसेनेकडून हरिभाऊ राठोड यांना वनमंत्री पद मिळाल्यास राज्यात शिवसेना अधिक मजबूत होईल, असा दावा त्यांनी केला आहे.