मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांच्या मार्फत १०० कोटींचा हप्ता वसुलीचा गंभीर आरोप केला होता.
पटोले म्हणाले की, “मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी या पद्दतीने वागणारे अधिकारी असतील तर मी बदली केली नसती निलंबितच केलं असतं”, असं नाना पटोलें यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.
अधिकाऱ्यांनी कोणाची बाहुली बनू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. फडणवीसांनी रश्मी शुक्लांचा उल्लेख केला. आता या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वापर भाजप करत असेल तर ही गंभीर बाब आहे असे पटोले यांनी बोलून दाखविले होते.
पुढे भाजपचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे, अशी टीका सुद्धा यावेळी पटोले यांनी केली होती.