नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वारंवार टीका करीत आहेत. यानंतर आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेही रा. स्व. संघावर निशाणा साधला आहे. देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही बनले आहेत, असा आरोप अभिनेता कमाल खान या अभिनेत्याने ट्विटद्वारे केला आहे.
Sometimes I try to understand, what’s the truth? What is right & wrong? And I get reply Nothing. Every Indian knows that Indians were under Britishers. #RSS refused to fight for freedom. Sardar Patel banned #RSS. But today RSS people are #Deshbhakts and all others are #Deshdrohi
— KRK (@kamaalrkhan) March 31, 2021
अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो की, काय खरं आहे? काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे? परंतु, याचे उत्तर मिळत नाही. प्रत्येक भारतीयाला तो ब्रिटिशांच्या अमलाखाली होता, हे माहिती आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास नकार दिला. सरदार पटेल यांनीही RSS वर बंदी आणली होती. पण, आज केवळ रा. स्व. संघवाले तेवढे देशभक्त म्हणवून घेत आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही ठरताहेत, असे ट्विट कमाल खान यांनी केले आहे.