गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा हप्ता वसुलीचा गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र आता या प्रकरणी तुम्ही हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. तसेच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.
माजी पोलीस संचालक सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या दोन सदस्यांसमोर खंडपीठाकडे सुनावणी होणार होती.
सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल विचारला होता.