राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध आघाडी सरकार असा संघर्ष पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी आरोग्य मंत्र्यांना सल्ला दिला आहे. तसेच रोहित पवारांनीं ट्विटमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक उपाय सुचवला आहे.
कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय. त्यामुळे राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले.
सध्याच्या घडीला राज्याला दिवसाकाठी ४ लाख लोकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारकडून वेगाने पुरवठा झाला तर ही संख्या आठ लाखापर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारची तयारी आहे. तरीही केंद्र सरकारने महाराष्ट्राला अवघ्या ७,४०,००० लसी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय.त्यामुळं राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा. pic.twitter.com/rFWpTwa97s
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 8, 2021