मुंबई – कोरोना विषाणू झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे परिस्थिती हि अधिकाधिक गंभीर होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारकडून कडक निर्बंध व वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परंतु याचा सामान्य नागरिकांना फटका बसला आहे. व्यापारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला आहे. कोरोना परिस्थिती अत्यंत भीषण असून हा कसोटीचा काळ आहे, या काळाला धैर्याने सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी म्हटले. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील वैद्यकीय स्टाफ दिवसरात्र देश वाचवण्यासाठी मेहनत करत आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे निर्बंध लावले ने जनतेच्या हितासासाठी आहे. कोरोना संकट दूर करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नाही. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी, केंद्र सरकार संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.
कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. या परिस्थितीला धैर्याने आपण सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे, आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या जिविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत असल्याचे शरद पवार फेसाबुक लाईव्हद्वारे म्हणाले