पाकिस्तान – सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसरीकडे भारतात कोरोनाचे रुग्ण जास्त वाढत असल्याने अनेक जण प्रार्थना करत असल्याचे चित्र समोर येत आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती सुधारावी यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनीही ट्विट करून भारतीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. ‘आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे, याचा सर्वानी मिळून सामना करू’ असं ट्विट बाबर आझमने केले आहे.
Prayers with the people of India in these catastrophic times. It's time to show solidarity and pray together. I also request all the people out there to strictly follow SOPs, as it's for our safety only. Together we can do it. #StayStrong pic.twitter.com/YCLb13ITlO
— Babar Azam (@babarazam258) April 26, 2021
बाबर आझमने ट्विटमध्ये म्हटले की, या संकट काळात भारतातील लोकांसाठी मी प्रार्थना करतो. ही वेळ एकजूट दाखवण्याची व प्रार्थना करण्याची आहे. लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं असे मी आवाहन करतो. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे, याचा सर्वानी मिळून सामना करू शकतो. असं ट्विट केलं आहे.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंही भारतीयांसाठी मदतीचे आवाहन केले होते. काही दिवसांपूर्वी दुबईतील बुर्ज खलिफावर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून कोरोनाच्या परिस्थितीविरूद्धच्या भारताच्या लढाईत पाठिंबा दर्शविण्यासाठी तिरंगा फडकविला. भारतीय दूतावासाने केलेल्या ट्विटमध्ये जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा १७ सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला असून त्यात भारतीय ध्वज आणि #staystrongIndia दाखविण्यात आल होत.