यंदा तुकाराम बीजेचा ३७३ वा सोहळा देहूत संपन्न झाला.अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. सर्वत्र ‘कोरोना’चे सावट असताना हा सोहळा अतिशय साद्या पद्धतीने पार पडला.
दरवर्षीपेक्षा यंदा सोहळ्यात वारक-यांच्या संख्येत यंदा मोठी घट दिसून आली.
संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यभरातून भाविक देहूत येतात.
परंतु, यंदा ‘कोरोना’ने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. पुण्यात कोरोनाचे हजारो रुग्ण आढळून येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली होती.
संस्थानच्या वतीने सोहळ्यानिमित्त मंदिरांमध्ये महापूजा,अभिषेक, काकडा आरती आदी धार्मिक विधी करण्यात आले.
दुपारी बाराच्या सुमारास भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली आणि बीज सोहळा संपन्न झाला.